शेकडो निरपराधांचे बँकेत मृत्यू झाले, तरी मोदींना नोटाबंदी हा झटका वाटत नाही?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी नोटाबंदी, राम मंदिर, RBI मधील वाद आदी विविध मुद्द्यांवर लोकसभा निवडणुका जवळ येताच भाष्य केले. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.
या मुलाखतीतील मोदींच सर्वात आश्चर्यकारक उत्तर हे नोटबंदी संबंधित प्रश्नावर पाहायला मिळालं. सदर प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, २०१६ मध्ये संपूर्ण देशात लागू झालेली नोटाबंदी हा काही झटका नव्हता, उलट आम्ही लोकांना वर्षभर आधीच पूर्वसूचना दिली होती, असे मोदींनी सांगितले. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी तो दंड भरून जाहीर करावा, अशी मुभा सरकारने दिली होती, पण लोकांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते, असा दावाही त्यांनी केला.
आपल्याजवळील काळा पैसा दंड भरून बँकेत जमा करा, अशी मुभा सरकारकडून आधीच दिली गेली होती. परंतु, मोदीसुद्धा इतरांसारखेच केवळ बोलघेवडे असतील, या भ्रमात सामान्य लोकं राहिले. त्यामुळे आमच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अखेर वर्षभराने म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाली, असे मोदी यांनी स्पष्ट केले. सदर मुलाखतीत मोदींनी सरसकट सर्वच लोकांना काळ्यापैशाचे धनी असाच समज केला, असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं