उत्तर भारतीयांच्या सन्मान रॅलीत सेनेचे मंत्री-आमदार-खासदार जातात, मग मराठी बेस्ट कामगारांसाठी?

मुंबई : मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये उत्तर भारतीय समाज संकटात सापडताच मुंबई आणि ठाण्यात थेट ‘उत्तर भारतीय सन्मान मेळावे आणि मोर्चे’ आयोजित करणारा शिवसेना पक्ष बेस्टचा मराठी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय रास्त मागण्यांसाठी संपावर गेल्यावर कुठे मग्न होता, असा प्रश्न मुंबईकरांना मागील ९ दिवसांपासून पडला आहे.
मुंबई आणि ठाण्यात ‘उत्तर भारतीयो के सन्मान में’ आणि ‘लाई चणा कार्यक्रम’ सऱ्हास पणे आयोजित करून आम्ही उत्तर भारतीयांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहोत असा संदेशच देण्याचे प्रकार सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील बेस्ट उपक्रमात नोकरदार वर्ग असणारा मराठी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मागील ९ दिवसांपासून संपावर होते. परंतु, शिवसेनेने अक्षरशः कानाडोळा केल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे. शिवसेनेने ना बेस्ट कामगारांचा विचार केला, ना सामान्य मुंबईकरांच्या अडचणीचा अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.
वास्तविक शिवसेनाच बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार करू पहाते आहे असा थेट आरोप बेस्ट कामगारांनी केला आहे. मागील दोन वर्षांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख आम्हाला केवळ आश्वासनं देत असून, त्यासाठी त्यांनी काहीच विशेष प्रयत्न केलेले नाही असा कामगारांचा आरोप आहे. त्यामुळे परप्रातीयांसाठी रस्त्यावर उतरून त्यांचा सन्मान जपणाऱ्या शिवसेनेवरून सामान्य मराठी माणसाचा विश्वास उडत आहे असंच चित्र सध्या तयार होतं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं