भारतातील निवडणुकीपूर्वी फेसबुक सावध; फेसबुकडून विशेष खबरदारी

नवी दिल्ली : जगभरातील मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकांमध्ये म्हणजे अगदी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुद्धा फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच भारतात सुद्धा त्याचे मोठे पडसाद उमटले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी फेसबुक सावध झालं असून त्यांनी त्यांच्या जगभरातील टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
भारतातील निवडणुकीत ७२ कोटीहून सुद्धा जास्त मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष थेट मतदाराकडे पोहोचण्यासाठी फेसबुकचा वापर करतील याची शक्यता लक्षात घेऊन फेसबुक उच्चस्तरीय काळजी घेताना दिसत आहे आणि त्यासाठी जगभर असलेल्या टीमला सज्ज करण्यात आलं आहे. स्वतः फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सैंडबर्ग त्यावर लक्ष ठेऊन असणार आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना फेसबुकच्या व्यवस्थापक केटी हार्बट यांनी सांगितले की, भारतातील निवडणुका आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मार्क साऱ्या घटनाक्रमावर नजर ठेऊन आहेत अशी माहिती दिली. तसेच फेसबुकच्या भारतातील कर्मचाऱ्यांबरोबरच कॅलिफोर्निया येथील मेन्लो पार्कच्या मुख्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांची टीम लोकसभा निवडणुकीवेळी भारतात तळ ठोकून काम करणार आहे.
फेसबुकवर २०१६ मध्ये अमेरिकेच्या निवडणुकीसह अन्य निवडणुकांना प्रभावित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी गजभरात खळबळ माजली होती तसेच त्यासंबंधित खटले सुद्धा अमेरिकेत सुरु आहेत. विशेष म्हणजे फेसबुकवर खासकरुन अमेरिकेतील आणि भारतातील करोडो मतदात्यांच्या माहितीशी छेडखानी केल्याचाही आरोप फेसबुकवर करण्यात आला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं