विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच त्यांना राम मंदिर आठवलं

कराड : भारतीय जनता पार्टीने सामान्यांना विकासाची दाखविलेली स्वप्ने पूर्णपणे भंग पावल्याने ते सामान्यांचे मन विचलित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. असे असले तरी रामाच्या नावावर भविष्यात पुन्हा मते मिळणार नाहीत,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केलं आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने, अशोकराव पाटील, सुनील पाटील आदी नेते मंडळी उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला प्रगतिपथावर घेऊन जाण्याचे काम केले आहे. तसेच त्यांच्या प्रगत विचारांची जोपासणा करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असं ते म्हणाले. पुढे राज्यातील बहुचर्चित मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, “फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच त्याचे संपूर्ण श्रेय फडणवीसांना मिळाले तरी आमची काहीच हरकत नाही; केवळ या प्रश्नी मराठा समाजाची फसवणूक करू नका, अन्यथा त्या समाजाचा मोठा उद्रेक होईल,’ असा इशारा सुद्धा त्यांनी भाजप-शिवसेना सरकारला यावेळी दिला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं