बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत: निलेश राणे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होत. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरा विषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोचरा प्रश्न केला आहे. राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला आणि अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे की,’बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत?’.
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भावनिक मुद्दा त्यावेळी शिवसेनेने उचलून धरला होता. परंतु सत्तेत येऊन इतकी वर्ष स्वर्गीय. बाळासाहेबांच्या त्या स्मारकाची साधी वीट सुद्धा रचली न गेल्याने निलेश राणें’ना आयतीच संधी मिळाली असून त्यांनी अचूक वेळ साधत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करणारा प्रश्न उपस्थित केला आहे.
नेमकं काय आहे माजी खासदार निलेश राणे यांचं ते ट्विट;
बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत? https://t.co/ut6Xal3nvh
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 14, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं