गणेश उत्सव आला की सुटले सरकारचे फर्मान : राज ठाकरे

नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून त्याआधी न्यायालय आणि मुंबई महानगर पालिकेकडून निरनिराळे फार्मन सुटू लागल्याने राज ठाकरेंनी त्या मुद्याला हात घातला आहे.
राज ठाकरे यांनी या मुद्यावर बोलताना म्हटलं की, आता गणेश उत्सव आला की सरकारचे फर्मान सुटले – गणपती एवढ्याच जागेत बसवा . एवढ्याश्या जागेत बसवायचा तर कपाटातच बसवतो . हवाय कशाला सार्वजनिक गणेश उत्सव ? असे आदेश कुठून आणि कसे निघतात ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच न्याय असेलच तर सर्व धर्माना समान हवा असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, ‘पूर्वी काँग्रेसच्या काळात हे घडत होते आणि आता भाजपचे राज्य आहे तरी हेच घडते आहे . तुम्हाला हव्या त्या गोष्टी कोर्टाकडून करून घेता आणि ज्या तुम्हाला नको आहेत त्या गोष्टी तुम्ही कोर्टाला नाकारायला लावता. न्यायालयं असो की निवडणूक आयोग असो, माझे हात जोडून सांगणे आहे की स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवा . तुम्ही कोणत्याही सरकारच्या नदी लागू नका अशी विनंती सुद्धा त्यांनी न्यायालयीन व्यवस्था आणि निवडणूक आयोगाला केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं