भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची आज ३४ वी पुण्यतिथी

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह देशातील अनेक मान्यवरांनी इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर इंदिराजींना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच इंदिरा गांधींच्या दिल्लीयेथील समाधीस्थळी जाऊन राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. तसेच इंदिरा गांधींच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, “आजीने मला खूप काही शिकवलं आणि माझ्यावर खूप प्रेम केलं. तिने देशातील सामान्यांसाठी सुद्धा खूप काही केलं. मला तिचा सार्थ अभिमान आहे’ अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंदिराजी देशाच्या एक सशक्त महिला पंतप्रधान म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या रोखठोक निर्णयांमुळे जगाला भारतापुढे नमते व्हावं लागलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् अत्यंत कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला होता. भारतानं त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करत अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार मिटविण्यासाठी सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात भारत एक आण्विक संपन्न देश म्हणून उदयास आला होता. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला देशातील विरोधकांनी नेहमीच प्रचंड विरोध केला हा इतिहास आहे. परंतु कोणालाही न जुमानता त्यांनी देशाहितासाठी कठोर निर्णय घेतले आणि त्यामुळेच त्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
Congress President Rahul Gandhi, former PM Manmohan Singh and Sonia Gandhi pay floral tribute at Shakti Sthal, the memorial of former PM Indira Gandhi on her death anniversary. pic.twitter.com/2Cm8GIz6rk
— ANI (@ANI) October 31, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं