सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर दूध आंदोलन मागे घेत आहोत: राजू शेट्टी

नागपूर : मागील चार दिवसांपासून सुरु असलेले दूध आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय राजू शेट्टी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राजू शेट्टी ही अधिकृत घोषणा केली आणि अखेर सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही प्रसंगी सरकारशी भांडतो परंतु दूध दराबाबतच्या सरकारच्या निर्णयाचं सुद्धा आम्ही मोठ्या दिलाने स्वागत करतो आणि या क्षणाला दूध आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामुळे उद्यापासून सुरळीत दूध पुरवठा होईल अशी घोषणा करण्यात आली.
राज्य सरकारने दुधाला २५ रुपये प्रति लिटर भाव देण्याचा निर्णय घेतला असून, सरकार दूध संघांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देणार आहे. तसेच या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २१ जुलै पासूनच करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या अनुदानामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर प्रति महिना ७५ कोटींचा बोजा पडणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं