सत्ता आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करणार: जयंत पाटील

कर्जत : देशात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतराव पाटील यांनी कर्जत येथील जाहीर सभेत केली. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित मृत्यूनंतर उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली होती आणि त्यांची ईव्हीएममुळे हत्या झाली, असे हॅकरने म्हटल्यानंतर खळबळ उडाली होती.
भारतातील महत्वाच्या संस्थात्मक रचना मोडीत काढण्याचे काम सध्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केले असल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर भाषणादरम्यान केला. दरम्यान, देशात स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी जर कुणी केली असेल तर तुमचे, माझे नेते शरद पवार साहेबांनीच असं ते म्हणाले. त्यावेळी जवळजवळ ७०,००० कोटी रुपयांची कर्जमाफी बळीराजाला देण्यात आली होती. परंतु सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असे सुद्धा जयंत पाटील म्हणाले.
उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यादरम्यान निवडणूकपूर्व घोषणा होणार आहेत, आणि यापुर्वी देशात कुणीच काही दिलं नाही हे भासवलं जाणार आहे, हे लक्षात घ्या, असे थेट आवाहन सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं