देशाची विविधता हीच आपल्या देशाची ताकद : राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केले. देशातील सर्व उपलब्ध संसाधनांवर प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे. देशाचा नागरिक हा कोणत्याही समाजाचा, समूहाचा असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील असो, आपन सर्व समान आहोत. विविधता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आणि ओळख आहे.
भारताची विविधता, लोकशाही आणि विकास हा संपूर्ण जगासमोर एक आदर्श आहे. हा दिवस म्हणजे भारतीय लोकतंत्रावर आधारीत सर्वोत्तम आदर्शांना स्मरण्याची संधी आहे, असे त्यांनी भाषणात सांगितले. तसेच देशाच्या गणतंत्र दिवसाचे हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे, कारण यावर्षी २ ऑक्टोबरला आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करू असे सुद्धा त्यांनी सांगितले.
महात्मा गांधीजींनी त्यांच्या विचारातून प्रत्येकालाच दिशा दाखवली आहे. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर आशिया, आफ्रिका आणि जगातील इतर देशांत साम्राज्यवाद नष्ट करण्यासाठी जनमानसात आत्मविश्वास जागा केला आहे आणि त्यांना सुद्धा स्वातंत्र्याची दिशा दाखवली आहे.
President Ram Nath Kovind in his address to the nation on the eve of the 70th Republic Day: #RepublicDay2019 is an opportunity for all citizens of the country to remember independence, equality, & brotherhood. pic.twitter.com/2G1YiztFbv
— ANI (@ANI) January 25, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं