राजस्थान पोटनिवडणूक भाजपसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा.

जयपूर : राजस्थान मध्ये ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीनही जागा काँग्रेसने खिशात घातल्या आहेत. राजस्थान पोटनिवडणूक २०१९ साठी मोदी आणि भाजपसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. विशेष म्हणजे राजस्थान मध्ये भाजपचं सत्तेत आहे.
राजस्थानमधील एकूण तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अजमेर आणि अलवर या २ लोकसभेच्या तर मांडलगढ ही विधानसभेची जागा होती. त्यासाठीच २९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक पार पडली होती. या तिन्ही मतदार संघातील भाजपच्या प्रतिनिधींच आकस्मित निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली होती.
भाजपच्या हक्काच्या या तीनही जागा काँग्रेसने स्वतःकडे अक्षरशा खेचून आणल्या आहेत. त्यामुळे ही २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ही भाजप आणि मोदींसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. काँग्रेस मध्ये या विजयानंतर आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.
Well done Rajasthan Congress! Proud of each and every one of you. This is a rejection of the BJP by the people of Rajasthan.#RajasthanByPolls
— Office of RG (@OfficeOfRG) February 1, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं