भाजपकडे थापा मारण्याचे 'स्किल', उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई : कालच्या रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदीसरकारवर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी असो किंव्हा मेहुल चोक्सीसारखे लोक देशाला लुटून पळून जातात आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र मात्र रोजगारासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत.
मुंबईच्या रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करणारी मुले ही गरीब कुटुंबातील आहेत, परंतु भाजप सरकार केवळ बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड ट्रेन सारख्या श्रीमंतांच्याच घोषणा देण्यात मग्न आहे.
एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टनचा पूल जसा लष्कराने बांधला तसा या मुलांचे प्रश्न सुद्धा लष्करचं सोडवणार आहे आणि तुम्ही सगळे केवळ आढ्यास तंगड्या लावून बसणार अशी कोणती योजना आहे काय ? असा प्रतिप्रश्न करून खोचक टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला आहे.
वाचा दै. सामनाचा आजचा अग्रलेख – ‘स्किल इंडिया’च्या थापाhttps://t.co/389snlPoSe
— saamana (@Saamanaonline) March 21, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं