कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ, अर्थमंत्री म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार?

नवी दिल्ली : बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करत आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
२०१९ हे निवडणूक वर्ष लक्षात असल्याने यामध्ये निवडणूकपूर्व घोषणांचा अधिक समावेश असण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोकसभा बरखास्त होण्याला आणि लोकसभा निवडणुका जाहीर होण्याला कमी कालावधी असल्याने सरकार दूर दृष्टिकोनातून विचार करण्यापेक्षा संभाव्य मतदारांना जास्तीत खुश करण्याचा प्रयत्न करेल असं अनेकांना वाटत आहे.
दरम्यान, २०२० पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर मिळणार असून आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा पियूष गोयल यांनी केली. तसेच देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार आमच्या सरकारने दूर केला. भारत अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. आमच्या सरकारने पारदर्शकतेचे नवे युग आणले आहे आणि आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवलं. यापूर्वी यूपीए सरकारच्या सत्ताकाळात अर्थव्यवस्थेवर प्रचंड बोजा वाढला होता जो आमच्या सरकारने मागील ५ वर्षात कमी केला, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.
Piyush Goyal: Inflation is a hidden and unfair tax; from 10.1% during 2009-14, we have broken the back of back-breaking inflation pic.twitter.com/8sc8CEeZFe
— ANI (@ANI) February 1, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं