अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना थेट 'चंपा' संबोधत जोरदार प्रतिउत्तर दिलं

पुणे: पवार म्हणाले,की भाजपकडून विधानसभा निवडणुकीतही ३७० चा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? गेल्या पाच वर्षांत भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अधोगतीकडे नेले. शेतीमालाला भाव, कर्जमाफी, नोकरभरती, बेरोजगारी, धनगर आरक्षण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार बांधवांना संबोधित केलं. त्यांनी उपस्थित केलेल्या
विविध प्रश्नांची उकल केली. यावेळी माझ्यासोबत पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि मान्यवर सुद्धा उपस्थित होते. यानिमित्तानं अनेक योजना आणि प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. pic.twitter.com/R3RRZhKO5J— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 9, 2019
पुढे अजित पवार म्हणाले “मी पार्थचा बाप आहे. त्याने विधानसभेला येऊ नये असं मला वाटतं. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही पक्षासंबंधी चर्चा करा,” असं संतापाच्या भरात अजित पवार म्हणाले. त्यानंतर मात्र पवार स्वतःच खळखळून हसले आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले.
पुढे अजित पवार यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील सडकून टीका केली. ते म्हणाले, चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे कसं अजित पवार तसं चंपा. ते जे काही म्हणतात त्याला काहीही अर्थ नाही. ते शऱद पवार यांनाही राजकारणातून बाजूला जातील म्हणतात. तुम्हाला तरी पटतं का? असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. पवारसाहेब कधी राजकारणातून बाहेर जातील का, त्यांनी किती चढ-उतार पाहिलेत. ५५ पैकी केवळ ५ आमदार उरल्यानंतरही ते तितक्यात तडतडीत बाहेर पडले. आजही, किती आक्रमकपणे ते महाराष्ट्रात आपली भूमिका मांडतायंत. मला हे सरकार बदलायचंय असं सांगत महाराष्ट्रभर फिरतायंत, असे सांगत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं.
राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशी परिस्थिती होते आहे. बेकारी वाढत राहिल्यास रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल. मुख्यमंत्र्यांनी अनेक मंत्र्यांना पायउतार केले. काहींची खाती बदलली. खडसे, तावडे, पुरोहित, मेहता यांची तिकिटे कापली. त्याची उत्तरे मात्र मुख्यमंत्र्यांनी दिली नाहीत, असेही ते म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं