वर्ल्ड कप २०१९ : आज टीम इंडियाचा मुकाबला श्रीलंकेशी

लंडन : वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. टीम इंडियाने ८ पैकी ६ सामने जिंकून सेमीफायनलचे तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. तर श्रीलंका याआधीच स्पर्धेबाहेर असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे हा सामना टीम दोनही संघांसाठी औपचारिकच असेल.
टीम इंडियाने आठपैकी ६ सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं कारण आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे या सामन्यात ते आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील. तसेच गोलंदाजीत सगळ्याच गोलानादाजांनी उत्तम कामगिरी केली आहे.
दरम्यान, श्रीलंकेला गमावण्यासाठी काहीच नाही त्यामुळे ते निर्भीड होऊन खेळतील. अनुभवाची कमतरता असलेला हा संघ याआधीच स्पर्धेबाहेर पडला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं