IND vs AUS 4th Test : भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला

सिडनी : भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत गारद केले आणि इतिहास रचला आहे. आजचा ५वा दिवस सुद्धा पावसामुळे पूर्णपणे वाया गेला आणि अखेर शेवटची चौथी कसोटी अनिर्णीत राहिली. त्यामुळे भारताने २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला आहे.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात तब्बल ७२ वर्ष ११ कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताने पहिल्यांदाच कांगारूंच्या भूमीत मालिका जिंकली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने आधीच ॲडलेड आणि मेलबर्न कसोटी सामने जिंकून कांगारूंविरुद्ध मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला मोठी कामगिरी करणे अपेक्षित होते.
परंतु सामान्याच्या सुरुवातीपासूनच कांगारू प्रचंड दडपणाखाली दिसत होते. विराट टीमने त्यांना सुरुवातीपासूनच सावरण्याची एकही संधी दिली नव्हती. भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा डोंगर रचला होता. चेतेश्वर पुजारा १९३ आणि रिषभ पंत १५९ नाबाद अशी खेळी करून भारताची बाजू भक्कम केली होती. आणि अखेर भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला होता.
विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघ १९४७ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत ११ मालिकेत भारताला कसोटी सामान्यांच्या मालिकेत एकदाही विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर आता ७२ वर्षानंतर भारतीय संघाला कांगारूंच्या भूमीत यश आले आहे.
ALL OVER! It’s a draw in Sydney and India claim a famous 2-1 series triumph – their first on Aussie soil! https://t.co/CaiEbSjKbT #AUSvIND pic.twitter.com/pVDD1z796S
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं