India vs NZ T20 : भारताची न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून मात

ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीमच्या गोलंदाजांचा भेदक मारा तसेच फलंदाजांच्या दमदार सलामीच्या जोरावर भारताने दुसरा ट्वेन्टी-२० सामना खिशात घातला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५८ धावांच लक्ष दिलं होतं. दरम्यान, भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला आणि यजमान्यांना धूळ चारली आहे.
भारताच्या कृणाल पंड्याने ३ फलंदाजांना तंबूत धाडत न्यूझीलंडच्या डावाला मोठं खिंडार पाडले. त्याला कृणाल आणि अन्य गोलंदाजांनी सुद्धा उत्तम साथ दिली. दरम्यान, न्यूझीलंडकडून कॉलिन डी’ ग्रँडहोमने किवींचा डाव सावरत अर्धशतकी खेळी साकारली.
न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली फटकेबाजी केली. रोहितने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. धवनने ३० धावा करत रोहितला उत्तम साथ दिली आणि भारताचा विजय सोपा केला.
2nd T20I. It’s all over! India won by 7 wickets https://t.co/QLAqM4GYnx #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 8, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं