Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
बिहारमध्ये तालिबानी कायदा ? | कॅम्पसमध्ये मुलींना बुरखा घालण्याचे आदेश
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात खूप गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. भागलपूर येथील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींनी शनिवारी दुपारी वसतिगृह अधीक्षकांनी कॅम्पसमध्ये बुरखा घालण्याचे निर्देश दिल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या दरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या गेटवर दगडफेक केली. त्यांनी आरोप केला की वसतिगृह अधीक्षक कॅम्पसमध्ये तालिबानचा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वडिलांचा घरात कोरोनाने मृत्यू | चिमुकली १६ तास बाबा किती झोपशील असं विचारात वडिलांच्या डोक्यावर हात फिरवत बसली
कोरोनाने बर्याच जणांचे जीव घेतले आहेत. देशात आज मोठ्या प्रमाणावर लोकं कोरोनाने मृत्युमुखी पडले असून कोणताही राज्य त्यापासून सुटलेलं नाही. इतर राज्यांप्रमाणे बिहार राज्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मात्र अनेक ठिकाणी मन सुन्न करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार | जेडीयू महागठबंधनच्या संपर्कात?
बिहारमध्ये पडद्याआड सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यात देशातील मोठ्या राजकीय व्यक्ती उतरल्या आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि स्वतः लालूप्रसाद यादव यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं आहे. या संदर्भात तेजस्वी यादव मोठी राजकीय योजना आखात आहेत ज्याचा थेट २०२४ मधील निवडणुकीशी संबंध आहे.
4 वर्षांपूर्वी -
अरुणाचल प्रदेशात भाजपकडून दगा | जेडीयूची बैठक | बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला?
भारतीय जनता पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. भारतीय जनता पक्षाने जेडीयूला एवढं मोठं खिंडार पाडलं तरी नितीशकुमार शांत आहेत. आमदार फोडल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. तर, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचं हे राजकारण मैत्रीसाठी योग्य नाही, असं सांगतानाच पण त्यामुळे बिहारमध्ये या घटनेचा काही परिणाम होणार नसल्याचंही त्याागी यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक अशी होणार | ऑनलाइन नामांकन, ग्लव्हज घालून मतदान
कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत. गाइडलाइन्स नुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक काळातील कामादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहारला वादळाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये गुरुवारी आलेल्या वादळाने राज्यात थैमान घातलं असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यात विविध भागात वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक १३ बळी हे गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी, ५ वर्ष कारावास.
लालू प्रसाद आणखी प्रकरणातही दोषी सिध्द झाले असून त्यांना चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणातही ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी