Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मनसे अधिकृतने फेसबुक पेज'वरून झेंडा हटवला; हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकणार?
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर वाटचाल करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. परंतु, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन कृष्णकुंज'वर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या भगव्या हिंदुत्वावरील राजकारणाची आम्हाला चिंता नाही: खा. विनायक राऊत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
5 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडेंचं ते ट्विट सत्य; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ: सविस्तर वृत्त
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: कात्रज गावठाण रस्ता चकाचक; नगरसेवक वसंत मोरेंचा विकास कामांचा धडाका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज गावठाण जुन्या बस स्टॉप समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरील वाहनांना देखील विस्तृत रस्ता उपलब्ध झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र धर्म आणि भगव्या हिंदुत्वाची सांगड; मनसेचे शिवसेना भवनासमोर पोस्टर
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या झेंड्यात बदल करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होतं असताना त्याला मनसेत कोणीही जसे स्वीकारले तसेच नाकारले देखील नाही. मात्र भविष्यात भगवे बदल होणार याचे अप्रत्यक्ष संकेत मात्र दिले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलत्या राजकारणाला अनुसरून एकतर सेक्युलर भूमिका स्वीकारेल किंवा हिंदुत्वाची असे निरनिराळे अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
RNA ग्रुपच्या ४०० कर्मचाऱ्यांचे २ वर्षाचे पगार थकले; कामगारांचं राज ठाकरेंना पत्र
आरएनए ग्रुपच्या सुमारे ४०० कर्मचारी-कामगारांना मागील २ वर्षं पगार मिळालेला नाही. आपल्या हक्काचे पैसे व देणी कंपनीकडून मिळवण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. अखेर आरएनए ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच पत्र लिहून या प्रकरणात “न्याय मिळवून द्या तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवकणूक व दमदाटी करणाऱ्या आरएनए मालकाला धडा शिकवावा”, अशी विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई ९/११ हल्ला: त्यानंतर मी 'लादेनला' दम दिला होता; मनसे नेत्याकडून राऊतांची खिल्ली
मी दाऊद इब्राहिमला दम भरला आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर मनसैनिकांनी आपली गाडी जाळल्याचं संजय राऊतांनी सांगितल्यावर, राज ठाकरेंकडून तुम्ही नवीकोरी गाडी घेतली होतीत, अशी आठवण देखील देशपांडेंनी करुन दिली.
5 वर्षांपूर्वी -
शर्मिला ठाकरेंच्या पुढाकाराने व्हेंटिलेटरवरील वाडिया इस्पितळास अर्थमंत्र्यांकडून ४६ कोटी देण्याचं मान्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. या भेटीत त्या अजित पवार यांच्यासोबत वाडिया हॉस्पिटलच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. शर्मिला ठाकरे यांनी वाडियाचा प्रश्नात व्यक्तिगत लक्ष घातलं आहे. काल देखील त्यांनी स्वतः वाडिया येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही; शर्मिला राज ठाकरे देखील मैदानात
अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे वाडियामधील सर्व रुग्ण, कर्माचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज लाल बावटा कामगार संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंचा खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणातील प्रवेश आणि भविष्यातील आव्हाने: सविस्तर वृत्त
अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार याची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार असल्याचं समजतंय.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: आ. राजू पाटील यांचं शहरातील प्रदूषण व अस्वच्छतेच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांना पत्र
‘मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत याबाबत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जर मनसेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल तर ते भाजपा'सोबत येतील: मा. गो. वैद्य
राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी म्हणजे ७ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोठे विधान केले आहे. “जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल. तर ते भारतीय जनता पक्षासोबत येतील,” अशी प्रतिक्रिया मा. गो. वैद्य यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: महाविकास आघाडीमुळे मनसेचे दिलीप दातीर यांचा पोटनिवडणुकीत पराभव
नाशिकमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.
5 वर्षांपूर्वी -
बेरजेच्या राजकारणावरून मनसे नेत्यांचा सुरात सूर; संदीप देशपांडेंचं 'बेरजेवर' ट्विट
देशातील एकूण राजकरण बदललं आहे, मात्र ध्येय धोरणांमध्ये गुरपटलेली मनसे तत्वांच्या आड नेहमीच पक्ष फायद्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आल्याने, आज मोठी राजकीय किंमत मोजत आहे. पक्षाचं नुकसान आणि पक्ष संपला तरी चालेल, पण समाज माध्यमांवर आम्ही तोंडघशी पडताकामा नये अशाच अविर्भावात मनसेचे कार्यकर्ते अनेकदा वावरताना दिसतात. आपण एक राजकीय पक्ष आहोत की समाज सेवी संस्था याचा अजून कारकर्त्यांनाच उलगडा झालेला दिसत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ज्याप्रमाणे नैतृत्व घेईल तो निर्णय पक्ष हिताचा समजून, केवळ बेरजेचं राजकरण समजून घेतात ते मनसेच्या कार्यकर्त्यांना स्वीकारताना अत्यंत कठीण असल्याचं दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
पालघर झेडपी: भाजप-मनसे युतीचा फायदा, मनसेचे दोन उमेदवार विजयी
पालघरमधील वाडा मतदारसंघामध्ये भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो असल्याचे समोर आले होते. या बॅनरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजपा आणि मनसेने युती केली असल्याची माहिती भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
सध्याचं राजकारण पाहता भविष्यात भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात: आ. राजू पाटील
३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक; मनसे-भाजप एकत्र येण्याचे संकेत?
माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे अशी माहिती समोर येते आहे. दुपारी ३.३० वाजता फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या दोघांमध्ये १ तास चर्चा झाली असे समजते आहे. २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंगही बदलणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकीकडे मंत्री नाराज आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले बहुचर्चित खातेवाटप तब्बल ७ दिवसांनंतर अखेर रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले. पसंतीची खाती न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली. राजीनाम्याची हूल दिलेले शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना ‘मातोश्री’वर समज देण्यात आली. राष्ट्रवादीत धक्कातंत्राचा अवलंब करण्यात आल्याने ज्येष्ठ नेत्यांची पंचाईत झाली, तर मंत्रिपदे न मिळालेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगण्याची वेळ काँग्रेसवर आली. एका बाजूला असं चित्र असताना दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र मनसेकडे जात असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला: मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी