Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Maha Budget 2021-22 | ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
4 वर्षांपूर्वी -
भिंवडीत तीन मजली इमारत कोसळली | दहा जणांचा मृत्यू
भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाडमध्ये ५ मजली ईमारत कोसळली | शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या ईमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. ईमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
३ वर्षांच्या मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; मुलांची योग्य काळजी घ्या
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
हसमुखच्या मर्सिडीजच्या अपघातात एका निरपराध महिलेचा मृत्य झाला होता; नंतर जामिनावर सुटला
कालच ठाणे शहरातील गाजलेलं प्रकरण म्हणजे हसमुख शहा या गुजराती व्यक्तीला मनसेने दिलेला चोप. राहुल पैठणकर नावाच्या व्यक्तीला शुल्लक कारणावरून हसमुख शाहा आणि त्याच्या मुलाने अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली होती. त्यानंतर तब्बल ५ दिवस त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रकरण मनसेकडे गेले होते. दरम्यान, राहुल पैठणकर यांनी दिलेल्या माहितीवरून मनसेने हसमुख शाहा याला शोधून काढला आणि चोप देत जाहीर माफी मागायला लावली होते.
6 वर्षांपूर्वी -
भिवंडी : शांती नगर येथे चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, ५ जण जखमी
येथील शांतीनगर परिसरातील एक ४ चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत अजून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर: पुराचा धोका! मुंबई पालिकेने धोक्याचा सायरन वाजवला; पालघरवासीयांना ‘जागते रहो'
मुंबईकरांना पहिले काही दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने मुंबईमध्ये जरी थोडी उसंत घेतली असली तरी पावसाने आता मोर्चा मुंबई नजीकच्या शहरांकडे वळवल्याचे दिसत आहे. ठाणे, पालघर जिह्यातील तानसा आणि वैतरणा ही दोन्ही मुख्य धरणे ओसंडून वाहू लागली असून आता कधीही पुराचा धोका संभवतो असे सूतोवाच प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे नद्यांनी देखील धोक्याची पातळी गाठली असून कोणत्याही क्षणी पूर येऊन परिसरातील तब्बल ७५ गावांची घर देखील पाण्याखाली बुडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचा शिवसेनेला सवाल, ठाणे कोपरी पूल कोसळण्याची वाट बघत आहात का? अविनाश जाधव
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील दुर्घटनेनंतर मुंबई आणि ठाण्यातील पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या कोपरी वाहतूक पुलाची अवस्था म्हणजे तो पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. हा पूल पूर्व द्रुतगती मार्गावर असून ठाणे येथील कोपरी विभागाच्या रेल्वे पटरीवरून वाहनांची ये जा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. असे असताना ठाण्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे कशाची वाट बघत आहेत? असा सवाल मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच हा पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जनसागर: मनसेच्या महामोर्चानें विरोधकांना धडकी
जनसागर: मनसेच्या महामोर्चानें विरोधकांना धडकी
7 वर्षांपूर्वी -
टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये साप
टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये साप
7 वर्षांपूर्वी -
ठाणे - भिवंडी बायपास वरील साकेत पुलाला तडे, सामान्यांच्या जिवाशी खेळ
ठाणे – भिवंडी बायपास वरील साकेत पुलाला तडे, सामान्यांच्या जिवाशी खेळ
7 वर्षांपूर्वी