Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
खऱ्या बापाची औलाद असेल तर हे आरोप सिद्ध करुन दाखवा | वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आला होता. आता पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तु जर बेछूट आरोप करत असशील, तु खऱ्या बापाची औलाद असशील तर वाटेल तसे आरोप करण्यापेक्षा हे आरोप सिद्ध करुन दाखव.
4 वर्षांपूर्वी -
पडळकर अज्ञानी बालक | ते आता-आता उगवलेलं गवत आहे - विजय वडेट्टीवार
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. त्यात हरवलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. त्यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घणाघाती टीका केली आहे. पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता उगवलेलं गवत आहे. त्यांना काय माहीत आहे?, अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता लोकच यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत म्हणतील 'लाव रे तो व्हिडिओ' | वडेट्टीवार यांचा टोला
आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोलेबाजी केली. दोघांच्या भेटीचे व आतापर्यंतचे व्हिडिओ लोकच लावतील, सोशल मीडियावर आता “लाव रे व्हिडिओ” सुरू होईल असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कारण, केंद्राकडे असलेला हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल”, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट म्हटले आहे. तसेच हा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रे लिहिली पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनचं लोकांना गांभीर्य नाही | सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस म्हणजेच 1 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात काय सुरु राहील आणि काय बंद राहील, असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत. मात्र प्रतिदिन हजारो लोकं कोरोनाने मृत्युमुखी आणि लाखो लोकं कोरोनाबाधित होतं असताना देखील जनतेला गांभीर्य नसल्याचं पहिल्या दिवशी स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा जीव जात असताना उत्सव कशाला | भविष्यात परिस्थिती अधिक भयावह होईल - वडेट्टीवार
दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असूनही राज्यात संक्रमितांची संख्या कमी झालेली नाही. याउलट कोरोना रुग्णांनी एक नवा विक्रम बनवला आहे. देशातील कोणत्याही राज्यांपेक्षा हा सर्वात मोठा आकडा आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन केस समोर आले. दरम्यान 349 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. worldometers नुसार नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्राने अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझीलला मागे टाकले आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील | पण....
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याची टिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सतत एका मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी