Video Viral | भारतीयांनो, चीन अरुणाचल प्रदेशात घुसून बांधकाम करू लागला, स्थानिक रहिवाशांनी दिली माध्यमांना माहिती, व्हिडिओ पहा

Video Viral Chinese construction work in Arunachal Pradesh | अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यातील स्थानिक भारतीय रहिवाशांनी एका महत्त्वाच्या घडामोडीत, छगलगाममधील हादिगरा-डेल्टा 6 जवळ चीन पीएलए (पीपल्स रिपब्लिक आर्मी) जवान बांधकाम करत असलेल्या मशीनरीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. इंडिया टुडेच्या सूत्रांनी पुष्टी केली की एखाद्या व्यक्तीस या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणत: चार दिवस लागतात आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) जवळील जिल्ह्यातील छगलगम हे शेवटचे प्रशासकीय पोस्ट आहे असाही समोर आलं आहे.
हा व्हिडिओ 11 ऑगस्ट 2022 रोजी स्थानिक भारतीय रहिवाशांकडून रेकॉर्ड करण्यात आला होता आणि या स्थानिकांनी इंडिया टुडेशी बोलताना, बीजिंगच्या कथित घुसखोरीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. भारत-चीन सीमेला लागून असलेल्या शी योमी जिल्ह्यातील मेचुका या गावच्या एका रहिवाशाने एलएसीजवळ चीनने पायाभूत सुविधा विकसित केल्याच्या नुकत्याच आलेल्या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे आणि भारत सरकार एवढं थंड का बसलंय हे देखील समजण्यापलीकडील आहे असं मत व्यक्त केलं आहे. याचे काय परिणाम होतील यावर देखील स्थानिक भारतीय खूप चिंता व्यक्त करत आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी त्यांचे पूर्वज १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी तिबेटला भेट देत असत आणि स्थानिक वस्तूंच्या बदल्यात तिबेटमधून मीठ, तांदूळ, दागिन्यांचा व्यापार करून वस्तुविनिमय पद्धतीत गुंतले होते, अशी माहितीही मेचुका येथील रहिवाशांनी इंडिया टुडेच्या प्रतिनिधींना दिली.
मात्र आता, भारतीय लष्कर कोणालाही आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जाऊ देत नाही,” असे नमूद करताना या रहिवाशाने सांगितले की, भारतीय बाजूच्या पायाभूत सुविधा ठीक नाहीत आणि पश्चिम सियांग जिल्ह्यातील मेनचुका ते अलो शहराला जोडणारा एकच रस्ता एक दशकाहून अधिक काळ येथे अस्तित्वात आहे.
चार लेन तयार करण्याचे काम पूर्ण :
चीनने सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी चार लेन तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. मेणचुका येथेही शाळा आणि वैद्यकीय संस्थांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने छोट्या रुग्णालयात फारच कमी डॉक्टर उपलब्ध असून शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव आहे. मेचुका येथे एकही महाविद्यालय नाही आणि विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत,” असे या रहिवाशाने सांगितले.
मोदी पंतप्रधान झाले तर चीन … अमित शाहंचं सत्तेत येण्यापूर्वीचं ट्विट व्हायरल :
तेव्हा सत्तेत येण्यापूर्वी अमित शहा म्हणाले होते, ‘सध्याच्या राजवटीत देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, असा दावा करून भाजप नेते अमित शहा यांनी सांगितले होते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याची हिंमत करणार नाहीत. मात्र यूपीए सरकारच्या काळात, जेव्हा जेव्हा चिनी सैनिकांची इच्छा असेल, तेव्हा ते आमच्या हद्दीत येऊन पिकनिक करतात आणि युपीए सरकार काहीही करू शकत नाही,”असं शाह म्हणाले होते.
Whenever the Chinese soldiers want,they come and have picnic inside our territory and our government could do nothinghttp://t.co/5wu63CSVMO
— Amit Shah (@AmitShah) April 25, 2014
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Video Viral Chinese construction work in Arunachal Pradesh video trending on social media check details 27 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं