पवारांच्या विदर्भ संदर्भातील विधानावर श्रीहरी अणे संतापले.

मुंबई : काल पुण्यात झालेल्या एका मुलाखती दरम्यान राज ठाकरेंच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, विदर्भात राहणाऱ्या मराठी माणसाला स्वतंत्र विदर्भ व्हावा असे अजिबात वाटत नाही. त्यावर विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी एक निवेदन काढत संताप व्यक्त केला आहे.
त्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा थेट विकासाशी संबंध आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा एकही ‘मराठी भाषिक’ मुख्यमंत्री हा विदर्भाचा विकास करू शकलेला नाही आणि त्यामुळेच वेगळे विदर्भ राज्य हवे आहे असे त्या निवेदनात श्रीहरी अणे यांनी म्हटले आहे.
वेगळ्या विदर्भासंदर्भात मराठी हिंदी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद हा निव्वळ खोडसाळपणा असून त्याद्वारे केवळ गैरप्रसार करणारा आहे. विदर्भात सर्वच भाषेचे लोक राहतात आणि आम्ही याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे. विदर्भ हे वेगळं राज्य झालं तर त्याचा मुख्यमंत्री हा हिंदी भाषिक असेल की मराठी भाषिक ही भीती फक्त विदर्भाचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना वाटत असेल असं ही श्रीहरी अणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं